देशसेवार्थ लष्करात मानव बॉम्ब नियुक्त:- राजन माकणीकर..

मुंबई दि (प्रतिनिधी) देशाच्या सीमेवर पाकविरोधात मला मानव बॉम्ब म्हणून नियुक्त करण्यात यावे अशी इच्छा पत्राद्वारे मराठवाद्याचे सुपुत्र लातूर जिल्हा, अहमद्पुर चे तालुक्यातील भूमिपुत्र, मुंबई उपनगरात वास्तव्यास असलेले पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री मा. राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.
डॉ. माकणीकर यांनी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,
मी कला शाखेतून पदवीधर असून, पत्रकारिता व सामान्य विज्ञान निसर्गपचार योगिक विज्ञान या शाखेतून विशेष
प्रावीन्यात शिक्षण पूर्ण केले आहे. माझ्या वयाच्या 18 व्या वर्षांपासून मी देशसेवार्थ लष्करात सामील होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र मी लष्करात सामील होऊ शकलो नाही हे माझं दुर्भाग्य आहे.
यापूर्वी सुध्दा मी 8 वेळेस तत्कालीन संरक्षण मंत्री भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारांना पत्र लिहून तर इमेल पाठवून तसेच लष्कर सेवेत भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या भारत मातेचा मी सुपुत्र असून या नात्याशिवाय या दुनियेत मी कोणत्याच नात्याला सन्मान देत नाही किंवा कोणतेही नाते जतन करत नाही. मी एक लावारीश म्हणून असलो तरी भारत मातेचा सुपत्र आहे.
लष्कर सेवेत माझा मृत्यू झाला किंवा युद्धात शहीद झालो तर केवळ आणी केवळ भारत मातेचा सुपत्र म्हणून माझ्यावर अंत्य संस्कार करावेत. कोणी नामधारी मित्र, सहकारी किंवा आई, बहिणी, बायको, मुलगी किंवा मुलगा असे व अन्य बनावट नाते सांगून माझा मृतदेह मागत असतील तर तो कुणालाही देवू नये.
लष्कराच्या वतीने विशेष भरती प्रक्रिया राबवून मानव बॉम्ब म्हणून माझी नियुक्ती पाकिस्तान अथवा चीन विरोधी कारवायांसाठी केली तर मी ते भाग्य समजून कर्तव्य जवाबदारीने पार पाडीन. अशि तीव्र इच्छा, मनोदय व आशावाद माकणीकर यांनी केंद्र सरकार कडे व्यक्त केला आहे.