भोकर( प्रतिनिधी) हिंसाचाराने मानवाचे कल्याण होत नाही जगाला युद्धाची नवे तर बुद्धाच्या विचाराची गरज आहे भगवान बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणणाऱ्या बौध्द बांधवानी त्यांच्या विचाराने चालतो का!याच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे यांनी केले. सोमवार दि.१२मे२५ रोजी मौजे सावरगावमेट ता.भोकर येथे उभारण्यात आलेल्या नवीन नालंदा बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भन्ते राजरत्न यांचे हस्ते करण्यात आले सकाळी बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष सुरेश जोंधळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाल्यानंतर वंदना व पूजापाठ घेण्यात आली सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार एल.ए.हिरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना हिरे म्हणाले हजारो वर्षांपासून चालत आलेली रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी बाबासाहेबानी जीवनभर संघर्ष करीत असतांना हिंदू धर्मातील कर्मठ लोकांनी त्यांचा खूप छळ केला तरीपण ते सहन करीत बुद्धाचे विचार स्विकारले त्यांनी इस्लाम किंवा शिख इतर धर्म स्वीकारला असता तर रक्तपात झाला असता भगवान बुद्धांनी शाक्य कोली यांच्यात पाण्यासाठी होणाऱ्या युद्धाला विरोध करून वनवासात जाने पसंत केले मानव कल्याणासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली.चक्रवर्ती राजा अशोक सम्राटांनी समतेचा बौद्ध धर्म स्वीकारून84 हजार बुद्ध विहारे बांधली छत्रपती संभाजी राजे यांनी चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला छ.शिवाजी राजे हे पण बुद्ध विचाराचेच होते असे सांगून हिरे म्हणाले संत थोर पुरुषाच्या विचाराने समाजाची प्रगती होते. .————–+++—++-++–+ चौकट *हिंदू बांधवांतर्फे भोजनदान* सावरगाव मेटच्या हिंदू बांधवांनी बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याला मदत करून भोजनदान दिले गावातएकोपा निर्माण केल्या बद्दल हिरे यांनी ग्रामस्थाचे मनभरून कौतुक करून संत गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांचा वारसा जपल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. ——-+++++————-++ यावेळी जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर म्हणाले जगाला बुद्धाच्या विचारांची गरज असल्याचे सांगून मी स्वतः बँकॉकहून बुद्धाची मूर्ती घरी आणली आहे.डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान सर्वांना न्याय देणार आहे.थोर पुरूषांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी असे आवाहन केले. यावेळी तेलंगणाचे आंबेडकरी नेते गिरीधारी जंगमे,गणपत जाधव पाळजकर,पप्पू पाटील कोंडेकर, नागनाथ घिसेवाड,यांनीही विचार मांडले यावेळी आनंद पाटील ढवळे,गणेश पाटील, प्रशराम पाटील डौरकर, दिलीप जाधव,जगदीश पाटील,पांडुरंग उमरे, बळीराम कदम, ज्ञानेश्वर माऊली, श्रीनिवास शिरमोड,शेटी बंडोड,संदीप गौड,डॉ साईनाथ वाघमारे,तोशिफ इनामदार,बी.एस.सरोदे,विक्रम क्षिरसागर आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन प्रा.रवींद्र जाधव यांनी केले तर आभार संजय सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागोराव सोनकांबळे,भोजराम सोनकांबळे, यशवंत सोनकांबळे, मारुती सोनकांबळे, पुंडलिक सोनकांबळे,भगवान सोनकांबळे,त्रिशरण सोनकांबळे,अशोक सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले रात्रीला दिपाली कांबळे लातूर विकास गायकवाड नांदेड यांच्या बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम झाला.